Buy Warli Painting Online

Warli Painting

रिफ्रेश व्हायचंय?



पद्मश्री राव


वीकएण्डला अनेक जण छोट्या ट्रिप आखत असतात. त्यासाठी मुंबईपासून जवळ असलेल्या ठिकाणांना प्राधान्य दिलं जातं. बरेचदा अशा ट्रिप एखाद्या बीचवर किंवा रिसॉर्टवर काढल्या जातात. पण एखाद्या धरणावर जाण्याचा बेत तुम्ही कधी बनवला आहे का? मुंबईपासून जवळच असलेल्या बदलापूरमध्ये एक सोडून दोन धरणं आहेत. बारवी डॅम आणि चिखळोली डॅम. या दोन्ही धरणांचा परिसर रम्य आणि शांत असल्याने एका दिवसात रिफ्रेश होण्यासाठी इथे जायला काहीच हरकत नाही.

.........

दशकभरापूवीर् ठाणे जिल्ह्यातलं देखणं आणि नेटकं गाव म्हणून बदलापूर प्रसिद्ध होतं. आता मात्र बदलापूरने कात टाकून शहरी रूप धारण केलं आहे. बदलापूर, अंबरनाथ ह्मद्ध गावांवर मुंबईचा प्रभाव पडल्यामुळे त्यांचा विकास झपाट्याने झाला. बदलापूर आता शहर बनलं असलं तरी त्याने आपल्या 'गावपणा'च्या खुणा जपल्या आहेत. स्टेशनपासून आत गेल्यावर हे गाव एकेकाळी किती टुमदार, रमणीय असेल याची साक्ष मिळते. या परिसरात पाहण्यासारखी बरीच ठिकाणं आहेत. विशेषत: एक दिवसाच्या सहलीसाठी ही ठिकाणं चांगली आहेत. बदलापूरच्या बारवी डॅमवर हौशी पर्यटकांची बरीच गदीर् दिसते.

बारवी हे उल्हास नदीवर बांधलेलं धरण आहे. इथलं निसर्गसौंदर्य आपल्याला मोहीत करतं. सध्या सुरक्षेच्या कारणास्तव धरणावर सगळीचकडे फिरता येत नाही. बारवी डॅमच्या परिसरात अनेक रिसॉर्ट्स आहेत. त्यामुळे पर्यटकांच्या निवास-भोजनाची व्यवस्था होतेे. बदलापूर स्टेशनपासून सुमारे १६ किलोमीटर अंतरावर हा डॅम आहे. हा सारा परिसर घनदाट वृक्षांनी वेढलेला आहे. उल्हास नदीच्या दोन्ही किनाऱ्यांना जोडणारा एक पूल आहे. मात्र इथे पुलाखाली जाण्यास मनाई आहे.

सुट्टी असते तेव्हा अनेक जण एखाद्या बीचवर जाणं पसंत करतात. अलिबागचे सर्वच समुदकिनारे सुट्टीच्या दिवशी गजबजलेले असतात. परंतु थोडा बदल म्हणून एखाद्या वीकएण्डला मुंबईपासून जवळच असलेल्या बारवी डॅमला जायला काही हरकत नाही.

बदलापूरातलं आणखी एक धरण प्रेक्षणीय आहे. ते म्हणजे चिखळोली धरण. बारवी डॅमच्या तुलनेत कमी प्रसिद्ध असलेलं हे धरण बदलापूरच्या पूवेर्ला आहे. बदलापूर स्टेशनपासून सुमार सात ते आठ किलोमीटर अंतरावर हे धरण आहे. हे धरण छोटेखानी असलं तरी आजूबाजूचा परिसर मात्र प्रेक्षणीय आहे. बदलापूर स्टेशनपासून थेट रिक्षेनेही इथपर्यंत येता येतं. बारवी डॅम इतकी सुरक्षाव्यवस्था इथे नसली तरी हे धरण तुलनेत कमी धोकादायक आहे. तरीही पर्यटकांनी अगोदर माहिती घेतल्याशिवाय पाण्यात उतरण्याचा धोका पत्करू नये. चिखळोली धरणाचा परिसर अतिशय शांत आहे. इथे जाण्याची खरी मजा पावसाळ्यात आहे. कारण पावसाळामुळे फुललेली इथली हिरवळ भुरळ पाडते. पण पावसाळ्याखेरीज एरव्ही कुठलाही मोसमात चिखळोली धरणाला भेट द्यायला हरकत नाही कारण शांत ठिकाणी थोडा वेळ घालावायची इच्छा असणाऱ्यांना यासारखं दुसरं ठिकाण सापडणार नाही.

बारवी किंवा चिखळोली धरणावर जायचा बेत आखत असल्यास काही गोष्टी ध्यानात ठेवा:

* बारवी डॅमला जाण्यासाठी बदलापूर स्टेशनपासून बससेवा उपलब्ध आहे.

* चिखळोली डॅमला रिक्षाने जात येत असलं तरी रिक्षा परतीसाठी थांबणारी असावी. कारण परत जाण्यासाठी इथे कुठलंही वाहन उपलब्ध नाही.

* स्वत:चं वाहन असल्यास सहलीचा आनंद अधिक मोकळेपणाने लुटता येईल.

Tribal toursim!

Virtual Tour - Dahanu's Mahalaxmi

Find us on Facebook

Map to Mahalaxmi

Dahanu Road Station [Western Rail way Mumbai suburban last station]> Charoti > Mahalaxmi 1. All MSRTC Buses routed to Mahalaxmi yatra 2. Regular 6 seater from Dahanu to Mahalaxmi 3. 6 seater from Dahanu to charoti & charoti to mahalaxmi autorikshaw 4. Individual vehicles [mahalaxmi is on NH 8, 125km from Mumbai towards Ahemadabad

Tribal Tourism