Welcome to Mahalaxmi Yatra!

Congratulation to Mr. Jivya Soma Mhase! Padmashree (Warli art)

how to reach mahalaxmi

Dahanu Road Station [Western Rail way Mumbai suburban last station]> Charoti > Mahalaxmi 1. All MSRTC Buses routed to Mahalaxmi yatra 2. Regular 6 seater from Dahanu to Mahalaxmi 3. 6 seater from Dahanu to charoti & charoti to mahalaxmi autorikshaw 4. Individual vehicles [mahalaxmi is on NH 8, 125km from Mumbai towards Ahemadabad

apali prerana

माहुलीचा इतिहास जागवताना



माहुली किल्ल्याचा स्वराज्यात समावेश झाल्याला ३५१ वर्षं पूर्ण झाल्याबद्दल माहुली निसर्ग मंडळातफेर् शहापूर, तसंच
माहुलीच्या परिसरात 'माहुली महोत्सव' आयोजित केला होता. त्यानिमित्त माहुलीच्या इतिहासाला दिलेला हा उजळा.

......

महाराष्ट्रातल्या इतर किल्ल्यांप्रमाणेच माहुली इतिहासाबद्दल फारसा बोलत नाही. भंडारगडावरील चोर दरवाजातल्या शिलालेखाव्यतिरिक्त कुठल्याही लिखित नोंदी माहुलीवर नाहीत. परंतु त्याचा ज्ञात इतिहास खरोखरच अभिमानास्पद आहे. या किल्ल्याचं बांधकाम शिलाहारांच्या काळात झालं, असा उल्लेख ठाणे जिल्हा गॅझेटिअरमधे सापडतो. परंतु माहुली किल्ल्याचाच एक भाग असलेल्या भंडारदुर्गावरील पाण्याच्या टाक्यावरून तो शिलाहारांपूवीर्च्या काळातही अस्तित्वात असावा. याला प्रमाण म्हणजे या पाण्याच्या टाक्याची बांधणी. अशी बांधकामं लेण्यांचा काळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सातवाहन कालखंडात केली जात.

किल्ल्याचा ठोस पुराव्यांवर आधारित इतिहास १४८५ पासून सुरू होतो. १४८५ मधे निजामशाहीचा संस्थापक मलिक अहमदने कोकणातील इतर किल्ल्यांबरोबरच माहुलीचा किल्लाही ताब्यात घेतला. १६३५ मधे संगमनेर जवळच्या पेमगिरी किल्ल्यावर शहाजी राजांनी निजामाचा शेवटचा वंशज मूतीर्जा याला निजामशाह म्हणून घोषित केलं. निजामशाही संपवण्यासाठी १६३५ मधे शाहजहान स्वत: महाराष्ट्रात उतरला होता. विजापूरच्या आदिलशहाला त्याने आपल्या बाजूला वळवलं. निजामशाही वाचवण्याच्या धामधुमीत पेमगिरी-जीवधनचा किल्ला सोडून शहाजीराजांनी लहानगा शिवबा आणि जिजाऊंसह माहुलीचा आश्रय घेतला. १९६३ मधे मुघल सेनापती खानजमान आणि रणदुल्लाखान यांनी माहुलीला वेढा दिला आणि शहाजीराजे आणि निजामशहाची कोंडी केली. ऑक्टोबर १६३६ तहामधे शहाजीराजांना माहुलीचा किल्ला खानजमान आणि रणदुल्लाखानाकडे सुपूर्द करावा लागला. निजामशाही बुडाली आणि त्याचबरोबर शहाजीराजांचे मराठेशाहीचं स्वप्न भंगलं. त्यांना आदिलशहाची चाकरी स्वीकारणं भाग पडलं. शहाजीराजांची बंगळूरला रवानगी करण्यात आली. त्यानंतर माहुलीचा किल्ला कधी मोगलांकडे तर कधी मराठ्यांकडे ये-जा करत राहिला. १६५७ मधे कल्याण-भिवंडी फत्ते करून स्वराजाच्या आरमाराची मुहूर्तमेढ रोवून शिवाजी महाराज जातीने माहुलीवर चालून गेले. ८ जानेवारी १६५८ मधे शिवाजी महाराजांनी तो मोगलांकडून जिंकला आणि शहाजीराजांच्या पराभवाचे उट्टं फेडलं. पुढील केवळ आठ वर्षं माहुली स्वराज्यात होता. १६६५ मधे मिर्झाराजे जयसिंग आणि दिलेरखानाबरोबर झालेल्या पुरंदरच्या तहात माहुलीचा ताबा पुन्हा मोगलांकडे गेला.

शिवाजी महाराजांची आग्य्राहून सुटका होताच उत्तर कोकणाच्या मोहिमेदरम्यान शिवाजी महाराजांनी १५०० मावळ्यांसह जातीने रात्री अचानक छापा घालून माहुलीचा किल्ला काबीज करण्याचा प्रयत्न केला. पण या मोहिमेत १००० मराठे कापले गेले. फारच जबर फटका महाराजांना बसला. मात्र महाराजांनी लवकरच संधी साधली. मोरोपंत पिंगळ्यांनी माहुलीस वेढा दिला. सुमारे दोन महिने माहुलीस वेढा टाकून हल्ले सुरू होते. १६ जून १६७० रोजी निकाराचा एल्गार झाला आणि माहुलीवर पुन्हा एकदा मराठ्यांचे निशाण चढले, असं या लढाईचं वर्णन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी केलं आहे. तेव्हापासून १८१७ मधील इंग्रज आणि पेशवे यांच्यातल्या पुणे तहापर्यंत जवळजवळ दीडशे वर्षं या किल्ल्याचं स्वामित्व मराठ्यांकडे होतं. एक अभेद्य तसंच महाभयंकर किल्ला (स्नश्ाह्मद्वद्बस्त्रड्डड्ढद्यद्ग स्नश्ाह्मह्ल) म्हणून या किल्ल्याचं वर्णन ठाणे जिल्हा गॅझेटियरमधे सापडतं.

१८१८ मधे कॅप्टन डिकन्सन नामक इंग्रज अधिकारी माहुलीवर आला. त्याने स्वत: फिरून माहुलीचं सवेर्क्षण केलं. सन १८१८ मधील कॅप्टन डिकिन्सनच्या भेटीपर्यंत गडावरील काही वास्तू शाबूत होत्या. मात्र १८६२ च्या आसपास किल्ल्याचं आणखी नुकसान झालं आणि किल्ल्यावरची तटबंदी जवळपास नष्ट झाली. माहुलीच्या दक्षिणेकडील एका घळीत एक दरीच्या तोंडाशी एक वैशिष्ट्यपूर्ण तुरुंग असल्याचं गॅझेटिअरमधे म्हटलं आहे.

शिवाजी महाराजांच्या ३०० व्या पुण्यतिथीनिमित्त दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या उपस्थित रायगडावर झालेल्या सोहळ्यात महाराष्ट्रातील अनेक पवित्र तीर्थक्षेत्रं आणि किल्ल्यांवरील पाण्याने महाराजांच्या समाधीला अभिषेक करण्यात आला होता. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ३०० हून अधिक तीर्थक्षेत्रं आणि किल्ल्यांवरून आणलेल्या पाण्याचे कुंभ रायगडावर आणले होते. राजांच्या समाधीवर अभिषिक्त होण्याचा पहिला मान होता तुळजापूरहून आणलेल्या जलकुंभाचा. त्यानंतर शिवनेरी आणि त्यानंतर महाराजांचं बालपण पाहिलेल्या माहुलीच्या गडगंगेला तिसरं मानाचं पान देऊन गौरवण्यात आलं होतं.

माहुलीवर आढळणारे घरांचे प्रशस्त चौथरे, तलाव तसंच मानवी वस्तीच्या खाणखुणा पाहत एकेकाळी या किल्ल्यावर प्रचंड वस्ती असावी. मात्र आता किल्ल्यावर उरले आहेत काही वीरगळ, भग्न तटबंदी, दगडधोंडे, चौथरे आणि मानवी वस्तीच्या खुणा दर्शवणारी आंबा, फणस, बकुळीची झाडं...

- रवींद पानसरे



original at - http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/4048980.cms


 
2010Dahanu's Mahalaxmi. To Promote tribal unity in Thane | Powered by AYUSH
Design and Concept by AYUSH | Dahanu Darshan By Adivasi | Distributed by AYUSHonline